Back
पारधी समाजाच्या जीवनात परिवर्तन: करमाळा पोलीसांच्या पहाट उपक्रमाची सुरुवात!
SKSACHIN KASABE
Aug 03, 2025 13:42:46
Pandharpur, Maharashtra
03082025
Slug - PPR_KARMALA_SOCIAL
file 02
------
Anchor - सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतील पहाट या पारधी समाजातील नागरिकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठीच्या उपक्रमाचा करमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत गावात पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आला
पहाट उपक्रमाच्या अंतर्गत पारधी समाजाची सामाजिक आर्थिक शैक्षणिक सक्षमता वाढवणे. त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे तसेच उद्योगधंदे करण्यासाठी प्रवृत्त करणे अशी ही संकल्पना आहे.
यासाठी करमाळा पोलिसांनी जिंती भगतवाडी या ठिकाणी पंचायत समिती समाज कल्याण विभाग, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, पोलीस पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पारधी समाजातील नागरिकांची बैठक घेऊन प्रबोधन केलं
चोऱ्या ,लुटमार गुन्हेगारी या पासून दूर राहून मुलांना शिक्षण देणे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असणाऱ्या योजनांबद्दल शासनाकडून मिळणाऱ्या सवलतींबद्दल पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी मार्गदर्शन केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowAug 06, 2025 14:33:01Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
*जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुद्दे*
बाईट ऑन न्यायाधीश नेमणूक प्रकरण
2024 सालीच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलाय..
न्यायमूर्तींची नेमणूक करताना त्यासाठी एक समिती असते..
मुख्य न्यायमूर्ती त्या समितीत असतात..
आता तुम्ही त्यांच्या निर्णयावर आक्षेप घेणार का ?
बहरूल इस्लाम हे काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेले होते..
त्यानंतर त्यांना न्यायाधीश करण्यात आलं..
त्यावेळी देखील काँग्रेसने स्पष्टीकरण देताना त्यांनी राजीनामा दिला असल्याचा कारण सांगितलं होतं..
रोहित पवारांना नवनवीन संशोधन करण्याची सवय लागली आहे..
त्यांनी इतिहास देखील तपासायला हवा..
मुख्य न्यायमूर्ती अध्यक्ष असलेल्या समितीवर ते आक्षेप घेतात हे गंभीर..
ऑन राहुल गांधी न्यायालय टिप्पणी
त्यांचा भंपकपणा नेहमी समोर आलेला आहे..
उद्या ते न्यायव्यवस्थेवर देखील टीका करायला सुरुवात करतील..
देशाबाहेर जाऊन देशाला व पंतप्रधानांना बदनाम करायचं..
यासाठी लोकसभेचे व्यासपीठ त्यांना होतं...
आता तर त्यांना डोनाल्ड ट्रम्प चे दाखले घ्यायची गरज भासू लागली..
देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबर वर आली त्याचं कौतुक त्यांना नाही..
मात्र डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतो त्याचं राहुल गांधींना कौतुक...
ऑन उद्धव ठाकरे दिल्ली दौरा
राज ठाकरे यांना काय पसंत आहे हे मला माहित नाही..
इंडिया आघाडीचा दायित्व उद्धव ठाकरेंना घ्यावा लागते..
ते दिल्लीला भोजन करतील कदाचित राज ठाकरेंनाही जेवायला बोलावतील..
एका ताटात जेवतील का नाही माहित नाही..
त्यांचा निर्णय त्यांना करायचा आहे..
आगामी निवडणुकात महायुती मजबूत असून आम्ही निवडणुका जिंकू..
ऑन एकनाथ शिंदे दिल्ली दौरा
कुठल्याही मोठ्या घडामोडी घडणार नाही.. हे केवळ तर्कवितर्क आहे..
तिथे काय चर्चा होतात मला माहित नाही..
शिंदे साहेब जेष्ठ नेते..
प्रशासनात काम करताना त्यांचा कुठेही अनादर करण्याचा प्रश्न येत नाही..
ते पंतप्रधानांना भेटायला गेले त्याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही...
0
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 06, 2025 14:19:41Nashik, Maharashtra:
nsk_pethtraffic
feed by 2C
anchor नाशिक पेठ महामार्गावर गेल्या 24 तासापासून वाहतूक कोंडी झाली आहे यामुळे शेकडो ट्रक रस्त्यात अडकले आहेत करंजाळी घाटात झालेल्या अपघातामुळे सातत्याने येथे वाहतूक कोंडी होण्याचा प्रश्न निर्माण होत असतो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घाटाची समस्या न सोडवल्यामुळे अधिक अडचणी निर्माण झाले आहेत
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 06, 2025 14:03:54Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक
खड्ड्याभोवती रांगोळी काढून केलं वृक्षारोपण
Ulh potholes agitation
Anchor उल्हासनगर शहरात सर्वत्र खड्ड्यानंचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय, या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक झाले असून ,फार्व्हर लाईन ते मध्यवर्ती रुग्णालय रस्त्यावर महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यानं भोवती रांगोळी काढून वृक्षारोपण केलंय, महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी ये आंदोलन करण्यात आलंय, येणाऱ्या गणपतीच्या आगमनापूर्वी शहरातील सर्वच रस्ते तात्काळ दुरुस्ती करावे अशी मागणी मनसेने केली आहे.
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 06, 2025 14:03:29Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - इस्लामपूर शहरात अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्यासाठी टक्कर मोर्चा.. तिघा तरुणांनी डोके फोडून घेत,प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधीचा केला निषेध..
अँकर - सांगलीच्या इस्लामपूरा मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि स्मारक व्हावे,या मागणीसाठी टक्कर मोर्चा काढण्यात आला.यावेळी तिघा तरुणांनी रस्त्यावर आपले डोके आपटून, रक्त सांडत प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला आहे.इस्लामपूरच्या तहसील कार्यालयासमोर एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आलाय,गेल्या अनेक वर्षांपासून शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा,अशी मागणी करण्यात येत आहे.मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने मातंग समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर टक्कर मोर्चा काढण्यात आला,यावेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संतप्त तरुणांनी रस्त्यावर डोकं आपटून,आपलं रक्त सांडत अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला आहे.
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 06, 2025 14:03:10Ambernath, Maharashtra:
बदलापूर पूर्व रिंग रूट परिसरात गुंडांचा दारू पिऊन धिंगाणा,
दिवसाढवळ्या पान टपरीची तोडफोड
Bdl tod fod
Anchor बदलापूर पुर्व रिंग रूट परिसरात एका पान टपरीवर काही गुंडांकडुन दगडफेक करून टपरीची नासधूस करण्यात आली आहे,पान टपरी मालकाने शासनाने बंदी घातली असलेला गुटखा दिला नसल्याचा राग धरत, टपरीतील सामानाची तोडफोड करण्यात आली आहे, दिवसाढवळ्या असा प्रकार घडत असल्याने पनवेल परिसरात दहशतिच वातावरण निर्माण झाल आहे, पनवेल हायवे परिसरात सातत्याने असे गुन्हेगारी प्रकार घडत असुन, बदलापूर पुर्व पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 06, 2025 14:02:46Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0608ZT_DAUNDYAVAT
FILE 1
यवत प्रकरणातील 19 आरोपींना न्यायालयीन कोठडी.....
Anchor_ दौंड तालुक्यातील यवत प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना दौंड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. पुढील तपास कामी यवत पोलिसांनी न्यायालयाला आरोपींची दोन दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती,मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी अमान्य करीत 19 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.....
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 06, 2025 13:49:20Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज
AC ::- लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती देवणी आणि कवठाळा ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानं 'ग्राम दरबार' हा नावीन्यपूर्ण उपक्रम कवठाळा येथे राबवण्यात आला... गावपातळीवरील समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी हा मंच उभारण्यात आला होता... मात्र, या दरबारात शेतकऱ्यांचा आक्रोश अनावर झाला... एका महिलेनं थेट तहसीलदारांपुढं आत्मदहनाचा इशारा दिला... आणि आता या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आलाय...
गेल्या तीन वर्षांपासून कवठाळा गावातून जाणार्या कानेगाव ते शेंद रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांला पेरणी साठी आणि शेतीच्या उदर्णीवासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तीन वर्षापासून तक्रारी देऊनही त्याचं समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून अद्याप मिळालेलं नाही... या सगळ्या पार्श्वभूमीवर या ग्राम दरबारात तहसीलदारांना शेतकऱ्यांनी थेट जाब विचारला आहे...
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 06, 2025 13:49:10Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- नरेंद्र पाटील
Feed 2C
नरेंद्र पाटील ऑन आरक्षण
Anc:-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे मात्र मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे अशी भूमिका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या काळात अपेक्षित असलेलं काम झालं नाही असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. तर देवेंद्र फडणीस यांच्या काळात कोर्टात काय भूमिका मांडायची या संदर्भात अभ्यास होत होता, मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात योग्य भूमिका न मांडल्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचे नरेंद्र पाटील यांना म्हटलंय. त्याचबरोबर दररोज रस्त्यावर उतरून कोणी आंदोलन करू शकत नाही गाड्या पडू शकत नाही मात्र जी जबाबदार दिली ती मी पार पाडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलाय.
बाईट:-नरेंद्र पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
नरेंद्र पाटील ऑन बँक
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कर्ज वाटप करताना राष्ट्रीयकृत बँकांकडून हलगर्जी पण होत असल्याचा आरोप मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. बँका उद्योगाला कर्ज देण्याऐवजी गाडी घेण्यासाठी कर्ज देत असल्याचे त्यांनी म्हटलंय. तर आपला माल विकण्यासाठी कुठेतरी शोरूमचा दुरुपयोग होत नाही ना याचं शोरूमने दखल घ्यावी असा सल्ला नरेंद्र पाटलांनी दिलाय.
बाईट:-नरेंद्र पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 06, 2025 13:48:38Ratnagiri, Maharashtra:
प्रमुख कार्यकर्त्यांचे पक्षांतर भास्कर जाधवांच्या जिव्हारी....
भास्कर जाधवांची रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका.
रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना वेड लागलं आहे.
आता रामदास कदम नाही तर आता बाम दास छम छम...
रामदास कदम यांच्या मी कधी पाया पडलो नाही पण स्वतः रामदास कदम विधान भवनाच्या लॉबी मध्ये पाया पडलेत.
हिंमत असेल तर रामदास कदम यांनी त्यांच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात यावं.
तीस वर्षांपासून तुम्ही भाडवेगिरीचे पैसे कमावलेत....भास्कर जाधव एकवेळ मरेल पण तुमच्या पाया पडणार नाही.
गुहागर मधील भाषणात भास्कर जाधवांची रामदास कदम यांच्यावर टीका.
माझ्या विरोधात जातो त्याचा बाप कसा काढतो ते पाहील असेल.
लवकरच आपलं सरकार येणार आहे आणि मी मंत्री होणार आहे - भास्कर जाधव
मंत्री नाही झालो तर येत्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता नक्की होणार....भास्कर जाधव यांचे सूतोवाच
0
Report
PNPratap Naik1
FollowAug 06, 2025 13:05:40Kolhapur, Maharashtra:
Kop Baithak
Feed :- Live U
Anc :- वनताराचे CEO कोल्हापूरात पोहचले आहेत. नांदणी मठाच्या स्वामीं सोबत वनताराच्या CEO ची बैठक देखील सुरू झाली आहे... कोल्हापूरच्या जैन बोर्डिंग मध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे..काही वेळे पूर्वी वनताराने आपलं अधिकृत म्हणणं जाहीर केलं आहे.. यामध्ये वनताराच्या टीमने कोल्हापूरकर आणि नांदणी मठाची दिलगिरी व्यक्त केली आहे...त्यामुळे आजच्या बैठकीनंतर वनतारा टीम काय घोषणा करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.... या बैठकीला नांदणी मठाचे स्वामी, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राहुल आवाडे, खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे या बैठकीला उपस्थित आहेत... दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिगंबर जैन बोर्डिंग मध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केलाय ..
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 06, 2025 12:34:14Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ मध्ये पीककर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बॅकेला शेतकऱ्यांनी कुलूप ठोकले आहे. भांबराजा गावात इंडियन बँकेचे अधिकारी-कर्मचारी शेतकऱ्यांना थकीत कर्ज भरणा करण्यासाठी वारंवार तगादा लावत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली, सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफीचे आश्वासन निवडणूक प्रचारावेळी दिले मात्र सत्तेत बसल्यावर कर्जमाफी मात्र केली नाहीं, त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. त्यात आता कर्ज वसुलीसाठी बँका तगादा लावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
बाईट : कुणाल जतकर
0
Report
KJKunal Jamdade
FollowAug 06, 2025 12:30:41Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
*अहिल्यानगरचे पालकमंत्री विखे पाटलांकडून पंचायत समिती कार्यालयाची झाडाझडती...*
राहाता पंचायत समितीच्या कार्यालयाची अचानक तपासणी...
*विविध विभागांच्या कार्यालयासह थेट स्वच्छता गृहात घुसून तपासणी...*
*स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल...*
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उडाली धांदल...
काही महिन्यांपूर्वीच साकारली आहे नूतन पंचायत समिती इमारत...
मात्र अस्वच्छतेमुळे पालकमंत्री विखे पाटलांनी केली नाराजी व्यक्त...
*जलजीवन योजनेच्या आढावा बैठकीसाठी राहाता शहरात आले असता विखे पाटलांकडून कार्यालयाची झाडाझडती....*
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 06, 2025 12:07:50Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - 2024 च्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाने केंद्रसरकारला पत्र पाठवल्यानंतर नवा कायदा केला
आगामी निवडणूकीत हे सरकार विरोधी पक्षाचे मतदान चोरणार
एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीत वाढलेल्या फेऱ्या... शिंदे याचा पक्ष भाजपला गळ्यातल लोडणं झालय.
शिंदेच्या.पक्षला जवळ ठेवायचं.नाही अशी भाजपची रणनीती
शिवसेना ही चोरली गेली आणि नियमबाह्य चिन्ह गद्दार गटाला दिले गेले
लवकरच सुप्रीम कोर्ट चिन्ह आणि पक्ष बाळासाहेबांचे मूळ वारसदार यांना मिळेल
महाराष्ट्र मध्ये लवकरच राजकीय उलथापालथ होईल
सत्ताधाऱ्यांना खरोखरच माझी भीती वाटते
27 तारखेचा पक्षप्रवेशाला एकनाथ शिंदे सोबत अनेक मंत्री देखील होते
गुहागर मधील पक्षप्रवेशाला कोट्यावधी रुपयांचा खर्च
साखरी आगर च जेटीचा प्रश्न हा मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करतोय
मी भांडत राहिलो ही माझी चूक आहे
जिल्हा नियोजनातील निधी वरून वैयक्तिक स्वार्थासाठी भांडतात
माझ्या हक्काचा निधी मिळवणे त्यासाठी मी समर्थ आहे
बाईट - भास्कर जाधव , ubt आमदार
0
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 06, 2025 12:07:45Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0608ZT_CHP_MLA_BACKTRACK
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रीच्या नावे होणाऱ्या चौक सौंदर्यीकरण व स्मारका संदर्भात प्रचंड विरोधानंतर आज आ. जोरगेवार यांचे एक पाऊल मागे, नागरिकांचा विरोध असल्यास तिथे स्मारक होऊ नये अशी घेतली भूमिका
अँकर:--चंद्रपुरात स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रीच्या नावे मनपाच्या 7 मजली इमारतीपाशी होणाऱ्या चौक सौंदर्यीकरण व स्मारका संदर्भात प्रचंड विरोधानंतर आज आ. जोरगेवार यांनी एक पाऊल मागे घेतले. जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा याच ठिकाणी आयुष्यभर बांबूच्या टोपल्या विक्रीसाठी बसत असत. त्यातूनच त्यांनी कुटुंबाचे पालनपोषण केले. फुटपाथ दुकानदार विक्रेता संघाने या ठिकाणी चौक नामकरण व सौंदर्यीकरण करण्याबाबत मनपाला पत्र दिले होते. स्मारक बांधकाम सुरू झाले मात्र काँग्रेसने याबाबत विविध आक्षेप घेत आंदोलन केले होते. हा मुद्दा अधिक वादग्रस्त झाल्याने नागरिकांचा विरोध असल्यास तिथे स्मारक होऊ नये अशी भूमिका आ. जोरगेवार यांनी घेतली आहे. नाव देऊन अथवा न देऊन अम्मा यांचे जनसेवेचे काम कमी होणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
HPHARSHAD PATIL
FollowAug 06, 2025 12:04:29Palghar, Maharashtra:
पालघर - बोईसर तारापूर मधील वाढत्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि टीमाची सुरू असलेली संयुक्त बैठक मनसेने उधळली. . नुसत्या बैठका नको तर प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा अशी मागणी करत मनसेने बैठक उधळून लावली आहे . बोईसरच्या एमआयडीसी टीमा हॉल येथे सदर बैठक सुरू होती. मनसेचे पालघर जिल्हाप्रमुख समीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी सदर बैठक बंद पाडली . बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखानदार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यात सुरू असलेली बैठक मनसेच्या गोंधळामुळे रद्द केली.
बाईट - समीर मोरे - जिल्हाप्रमुख पालघर मनसे
0
Report